Talegaon Dabhade : संदीप पानसरे यांची गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुणवंत कामगार पुरस्कारासाठी मावळ तालुक्यातील उर्से येथील महिंद्रा सीआयई कंपनीतील संदीप दत्तात्रय पानसरे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल कामगारवर्गातून त्यांचे स्वागत, अभिनंदन करण्यात येत आहे.

पानसरे हे उर्से येथील महिंद्रा सी आय ई कंपनीत गेली एकवीस वर्ष काम करीत आहे.हे काम करीत असताना कामगारांच्या विविध समस्या सोडविण्याचे काम त्यांनी केले.याशिवाय कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती मिळवून देणे,वंचित मुलांना शालेय साहित्य वाटप करणे, शालेय मुलींना स्वच्छता व आरोग्य अभ्यास वर्ग घेणे, दिव्यांगासाठी लागणारे साहित्याचे वाटप करणे, निराधार वृद्धांना आधार देण्यासाठी आधार केंद्र चालु केले आहे. कंपनीत काम करत असताना त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशा त्यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याने मावळ तालुक्यातुन त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.