Dighi Crime News : दिघी आणि आळंदी येथील अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज – दिघी आणि आळंदी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. दिघी येथील अपघात 12 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेपाच वाजता, तर आळंदी येथील अपघात 28 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता झाला आहे. याबाबत बुधवारी (दि. 14) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या अपघात प्रकरणात गोरख दिलीप चव्हाण (वय 23, रा. वाघेश्वर चाळ, च-होली) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलीस हवालदार दत्तू विठोबा बोराडे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मयात गोरख हा 12 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेपाच वाजता त्याच्या दुचाकीवरून भरधाव वेगात जात होता. ताजणेमळा येथील च-होली सर्विस रोडवर गोरख याने रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या एका टिपरला पुढच्या बाजूने जोरात धडक दिली. यामध्ये गोरख गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या अपघात प्रकरणात समाधान सुरेश बवले असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणात कल्पेश सिमाराम बवले (वय 28, रा. वडगाव घेनंद, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयशर टेम्पो (एम एच 12 / एच डी 1238) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी आयशर टेम्पो चालकाने भरधाव वेगात टेम्पो चालवून समोरच्या बाजूने येणा-या एका डिस्कव्हर दुचाकीला (एम एच 14 / डी डी 5950) समोरच्या बाजूने जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार समाधान बवले याचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी टेम्पो चालक घटनेची माहिती न देता पळून गेला आहे.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.