गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून टोळक्याची तिघांना मारहाण

वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून 12 ते 13 जणांच्या टोळक्याने तिघांवर कोयत्याने वार केले. ही घटना गुरुवारी (दि.16) सायंकाळी साडेसात ते साडेआठच्या सुमारास तापकीर चौक, थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी सिल्व्या चोपडे (रा. काळेवाडी), राजू लोखंडे (रा. श्रीनगर, रहाटणी) आणि अमोल चंदनशिवे (रा. थेरगाव) यांच्यासह त्यांच्या आठ ते नऊ साथीदारांविरोधात दहशत माजविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्षय ओव्हाळ (वय 23, रा. जगतापनगर, थेरगाव) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शुभम ओव्हाळ  याच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करून त्याला हाताने मारहाण केली. त्यावेळी अक्षय हा अमोल चंदनशिवे याच्याकडे त्याचा जाब विचारण्यासाठी गेला होता. त्यानंतर आलेल्या टोळक्याने अक्षय ओव्हाळ याच्यावर कोयत्याने वार केल्याचे, पोलिसांनी सांगितले.

तौफिक भांडणे सोडविण्यासाठी गेला असता टोळक्याने त्याच्याही खांद्यावर कोयत्याने वार केले. तौफिक आणि अक्षय घरी गेले. त्यानंतर टोळक्याने आराडा-ओरडा करत परिसरातील वाहनांची तोडफोड करत दहशत माजविली. तसेच अनिकेत कांबळे याच्या उजव्या हाताच्या पंजावर कोयत्याने वार केल्याचे, पोलिसांनी सांगितले. वाकड ठाण्याचे फौजदार आर.पी.केंद्रे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.