एमपीसी न्यूज -पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे शहर सरचिटणीस विलास मडिगेरी (Pimpri)यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि.5) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे.मडिगेरी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, अन्नदान, आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करियर मार्गदर्शन असे उपक्रम सलग 19 वर्षापासून राबविण्यात येत आहे.
यावेळी भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ उद्योजक विजय जगताप, भाजपा दक्षिण भारत आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, कामगार नेते सचिन लांडगे,वैशाली खाडये, पीएमपीएमएलचे व्यवस्थापक सतीश गव्हाणे ,नेहरूनगर डेपोचे व्यवस्थापक दहातोंडे संतोष लांडगे उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक रवी लांडगे, रणजीत कलाटे, प्रदीप तापकीर, योगेश लांडगे, राहुल लांडगे, माऊली जगताप, शिवराज लांडगे, उद्योजक विलास भाबुर्डेंकर, व्यंकटराव शिंदे, नेताजी घारे, चंद्रकांत देशमुख, शिवकुमार आग्रे, राजेंद्र जगताप, प्रवीण जोशी, गजान गुळवे, यशवंत गुंजाळ, संतोष नायर, उदय कदम,नाना राऊत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व असंख्य नागरिकांनी विलास मडिगेरी यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
इंद्रायणीनगर येथील सेक्टर 1 चैतन्य पार्क परिसरात पीसीएमसी उद्यान अधिक्षक राजेश वसावे आणि विलास मडिगेरी कॉलनीतील मान्यवरांच्या यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी 2 वर्षा पुढील 100 वृक्ष लावण्यात आले.
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल रक्तपेढी व वायसीएम रुग्णालय रक्तपेढी तसेच लाईफ लाईन ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये 280 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन भोसरी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या हस्ते झाले.
भोसरीतील पताशीबाई लुंकड अंधशाळा, महापालिका वैष्णोमाता प्राथमिक शाळा, गुळवेवस्ती येथील यशवंतराव चव्हाण आश्रमशाळा येथे अन्नदान करण्यात आले असून पांजरपोळ गोशाळेला चारा व गूळ दान करण्यात आले. श्री साई चौक मित्र मंडळ व श्री विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान, श्री वैष्णोमाता मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी, युवा कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
गुणवंत विद्यार्थी व पालकांसाठी करियर मार्गदर्शन…
दहावी, बारावीच्या 380 गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. विद्यार्थी व पालकांसाठी करिअर बदल्या वाटा आणि संधी या विषयावर डॉ. संतोष मचाले यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. दहावी, बारावीनंतरच्या करियरच्या संधी शोधून भविष्यामध्ये पुढे जायचे असेल, तर गुणवत्तेवर काम करावे लागेल. यशासाठी करियरच्या अनेक वाटा आहेत. त्या समजून घेण्याची आणि पालकांनी जागे होण्याची गरज आहे. मुलांमधील गुण ओळखा आणि त्यानुसार त्याच्या शिक्षणावर खर्च करा. त्यांना कौशल्ये आत्मसात करू द्या, असे आवाहन डॉ. संतोष मचाले यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले तर धनंजय जाधव यांनी आभार मानले.