एमपीसी न्यूज – जिल्हा परिषदांच्या शाळांमधील आणि खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकांची भरती ऑगस्ट महिन्यात होणार आहे. त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील साडेतीन हजार तर खासगी अनुदानित संस्थांमधील(Maharashtra News) साडेसहा हजार अशा एकूण 10 हजार पदांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये 30 टक्के पदे रिक्त आहेत. शासनाच्या निर्णयानुसार 20 टक्के पदे रिक्त राहतील. उर्वरित 10 टक्के पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान एनटी सी प्रवर्गाच्या आक्षेपामुळे 10 टक्के पदे रिक्त ठेवण्यात आली होती.ही पदे आता ऑगस्ट महिन्यात भरली जाणार आहेत. मागील शिक्षक भरतीच्या वेळी ज्या खासगी अनुदानित संस्थांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नाही, त्यांनाही या भरतीमध्ये संधी मिळणार आहे. तसेच ज्या महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या शाळांमधील शिक्षक भरतीसाठी जाहिरात अपलोड करता नाही, त्यांनाही त्यांनाही या भरतीमध्ये सहभागी(Maharashtra News) होता येईल.
Mumbai : मुसळधार पावसाचा मुंबईच्या विमान सेवेला फटका, 50 उड्डाणे रद्द
शिक्षक होण्यासाठी डीएड -बीएड उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करावी लागते. तसेच बीएड धारक उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) उत्तीर्ण व्हावे लागते. ही परीक्षा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होणार आहे.खासगी संस्थांना पवित्र पोर्टलवरून उमेदवार मिळणार आहेत. एका जागेसाठी दहा उमेदवार पाठवले जातील. त्यातूनच संस्थांना मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवार निवडावा लागणार आहे.