एमपीसी न्यूज – चाकणचा वाढता विस्तार पाहता चाकणसाठी वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न उभा राहाणार आहे. मात्र या (Chakan )समस्येसाठी प्रत्येक निवडणूकी वेळी केवळ आश्वासनेच दिली जातात.मागील 20 वर्षापासून नागरिक उपाय योजनांची वाट पहात आहेत, अशी टिका सामाजिक कार्यकर्ते राजेश अग्रवाल यांनी केली आहे.
राजेश अग्रवाल म्हणाले की, दर वेळी निवडणुकांची आचारसंहिता संपली की वाटत की आत्ता नाशिक फाटा ते राजगुरुनगर व तळेगाव ते शिक्रापूर रस्त्याचे काम सुरू होईल. कारण हा रस्ता वीस वर्षांपासून मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया मागील पंधरा वर्षा पासून सुरु आहे. पण प्रत्यक्षात ह्या रस्त्याचे काम सुरू व्हायला अजून किती दशके लागतील देव जाणे. चाकण खेड भागात मागील पंधरा वर्षात वाहतूक वीस पट वाढली पण इथे रस्ता रुंदीकरण झालेच नाही. चाकण -खेड तालुका हा विकासाच्या दृष्टीने एक मागासलेला भाग आहे. जिथे पाणी नाही, रस्ते नाही, कचरा उचलण्याचे व्यवस्थापन नाही त्यामुळे सर्वत्र घाण व दुर्गंधी असते. दोन किलोमीटर रस्ता पार करण्यासाठी अर्धा-पाऊण तास, अशी परिस्थिती आहे.
Sangvi : शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी झाडे लावणे गरजेचे – ला .शैलजा सांगळे
कंगाल पीएमआरडीए ह्या विभागातून मोठा महसूल उकळते आणि हिंजवडी मेट्रोसाठी खर्च करते पण इथे शून्य टक्के खर्च करते. उदासीन राजकीय नेतृत्वाने इथे कधी महानगरपालिका होऊ दिली नाही. होऊ घातलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ पळवून लावले. या भागात मोठ्या प्रमाणत राजकीय वरदहस्त खाली माथाडी नेते प्रत्येक कंपनी कडून हप्ता वसुली करतात. जो पर्यंत येथील स्थानिक जनता आवाज उठवत नाही तोपर्यंत चाकण अजून बकाल होत जाईल, अशी भीतीही अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.