एमपीसी न्यूज -तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे(Mumbai ) मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी ते अनेक कामांचा शुभांरभ केला आहे. राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणाऱ्या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘माझं ध्येय मुंबईला जगाची थिंक टॅक कॅपिटल बनवायची आहे. टुरिझममध्ये महाराष्ट्र भारतातील नंबर वन राज्य बनावं. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षी किल्ले आहेत. इथे सह्याद्रीच्या रांगा आहेत. कोकणातील अथांग समुद्र आहे. कॉन्फरन्स टुरिझम आणि मेडिकल टुरिझमची शक्यता आहे. महाराष्ट्र भारतात विकासाची नवी गाथा लिहिण्याचं काम करत आहे. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. हा कार्यक्रम हेच ध्येय गाठण्यासाठी आहे.’
Alandi : आळंदी शहर शिवसेना(शिंदे गटाची) कार्यकारिणीची निवड जाहीर
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, येत्या २५ वर्षात भारताला विकसित करण्यात येणार आहे. यात मुंबईचा मोठा वाटा असेल. मुंबईत सर्वांचा जीवनस्तर सुधारावा, क्वालिटी ऑफ लाइफ चांगलं व्हावं हे आमचं ध्येय आहे. त्यामुळे मुंबईतील आसपासची कनेक्टिव्हिटी चांगली करण्याचं काम केलं जात आहे. मुंबईत कोस्टल रोड आणि अटल सेतू पूर्ण झाले आहेत. अटल सेतू बनत असताना त्याविरोधात अनेक गोष्टी पसरवल्यात. हा सेतू पूर्ण होऊ नये म्हणून प्रयत्न झाले. पण आज त्याचा किती फायदा होतोय हे सर्व अनुभवत आहेत. या सेतूवरून रोज २० हजार गाड्या जात आहेत. या सेतूमुळे रोज २० ते २५ लाख रुपयांचं इंधन वाचत आहे. एवढंच नव्हे तर लोकांना पनवेल जाण्यासाठी आता फक्त ४५ मिनिट कमी लागतात. म्हणजे वेळेची बचत होत आहे आणि पर्यावरणाचा फायदा झाला आहे.
‘आपल्याला मुंबईची वाहतूक सुविधा आधुनिक करत आहोत. मेट्रोच्या विस्ताराचं काम वेगाने सुरू आहे. दहा वर्षापूर्वी मुंबईत केवळ ८ किलोमीटर मेट्रो लाईन होती. आजही ८० किलोमीटर झाली आहे. एवढंच नव्हे तर मुंबईत सुमारे २०० किलोमीटर मेट्रो नेटवर्कवर काम सुरू आहे. भारतीय रेल्वेचा कायापालट होत आहे. त्याचा मुंबई आणि महाराष्ट्राला फायदा होत आहे.’अशी यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.