या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी गोरान ग्रॉसकोफ फॅमिली क्लिनिकच्या अध्यक्ष फ्रेणी तरापोर, उपाध्यक्ष गीतांजली देशपांडे पद्मश्री लीला पुनावाला , प्रमुख पाहुणे डॉ मुक्तजा मठकरी , शर्मिला ब्रम्हे , डॉ नेहा साठे , परिमल चौधरी, पल्लवी साबळे आणि चंदर खोसला उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला फ्रेणी तारापोर यांनी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया आणि गोरान ग्रोसकॉफ फॅमिली क्लिनिकचा इतिहासावर माहिती दिली . तारापोर या संस्थेच्या वरिष्ठ सदस्य असून एफ. पी. ए. इंडिया , पुणेच्या संस्थापक सदस्य आहेत गेली 47 वर्षे लैंगिक आणि प्रजनन आरोग्य आणि हक्क यासाठी कार्यरत आहेत.
गीतांजली देशपांडे यांनी महिलांचे लैंगिक आणि प्रजनन हक्क यावर प्रकाश टाकला. महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल जागृत करण्याची गरज आहे, त्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांपासून बचाव होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे होते. तसेच, सुरक्षित गर्भपाता संदर्भातील कायद्याच्या तरतुदी बद्दल त्यांनी माहिती दिली.डॉ स्मिता जोशी यांनी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध आणि एचपीव्ही लस याबद्दल शास्त्रीय माहिती दिली आणि उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचा महिलांच्या आरोग्यावर कुटुंबावर आणि परिणामी समाजावर होणाऱ्या परिणामाबद्दल डॉ नेहा साठे यांनी विचार व्यक्त केले. स्त्रिया आरोग्याच्या बाबतीत स्वतःला दुय्यम स्थान देतात आणि बरेचदा कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागते. महिलांना आयुष्यामध्ये लहान वयात मुलांना जन्म देणे, अनुचित आहार, रजोनिवृत्ती ,अशा अनेक आरोग्य समस्यां आणि शारीरिक बदलांमधून जावे लागते त्यासाठी महिलांमधे जागरूकता करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले.
डॉक्टर रमेश भोसले यांनी गर्भाशयमुखासाठी प्रतिबंध करणाऱ्या एचपीव्ही लसी बद्दल असलेल्या गैरसमजांची माहिती दिली एचपीव्ही लसीमुळे होणारे फायदे त्यांनी विविध पुरव्या मार्फत सर्वांसमोर मांडले आणि समाजात असणाऱ्या गैरसमजाना बळी न पडता मुलामुलींना कर्करोगाच्या बचावासाठी एचपीव्ही लस देण्यासाठी आवाहन केले.75 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या महासंस्थापक डॉ कल्पना आपटे यांनी जीजीएफसी येथे नव्याने दिल्या जाणाऱ्या वीस आठवड्यांपर्यंतच्या सुरक्षित गर्भपात सेवेची घोषणा केली.डॉ. मुक्ताजा मठकरी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. स्त्रियांचे दुय्यम स्थान आणि शिक्षणाची कमतरता याबद्दल त्यांनी विचार व्यक्त केले. तसेच संस्थेच्या विविध सेवा आणि उपक्रमांचे कौतुक केले. प्रत्येकाने मर्यादित विचार न करता सर्वसमावेशक विचार ठेवला तर त्याचा फायदा फक्त देशालाच नाही तर जगाला होऊ शकतो, असे विचार त्यांनी व्यक्त केले.