एमपीसी न्यूज – कालपासून सुरु असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे सुस-महादेवनगर परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला असून महानगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे, अशी मागणी ऋषिकेश कानवटे यांनी केली आहे.
Bhosari : महावितरणच्या मुख्य केंद्रात ट्रान्सफॉर्मरला आग;सुदैवाने जीवितहानी नाही
रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सुसगाव परिसरातील महादेवनगर परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी वाहत असल्याने या परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.सुसगाव परिसरामध्ये रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने महादेवनगर परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी वाहत आहे. रस्त्यांवर ओढ्याचे सारखे पाणी येत असल्याने या परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला असून, महादेव नगर परिसरातील नागरिक प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून देखील मागील तीन वर्षापासून सुस महादेवनगर परिसरातील हा रोड अद्याप झाला नाही, त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून सर्व प्रकार वापरून लवकरात लवकर हा रोड करण्यात यावा अशी मागणी ऋषिकेश कानवटे यांनी केली आहे.