एमपीसी न्यूज-वडिवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडलीका नदी (इंद्रायणी नदी) पात्रामध्ये 10000 कुसेक्सने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, याची सर्वांनी कृपया नोंद घेण्यात यावी.तरी इंद्रायणी नदीवरील देहू ते तुळापूर यामधील बंधाऱ्यावरून पुराचे पाणी जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. तरी पूरपरिस्थितीमध्ये इंद्रायणी नदीपात्रामध्ये न जाणे तसेच कोणत्याही प्रकारची वाहतूक बंधाऱ्यावरून न करणेबाबत मोशी शाखेमार्फत सर्वांना आवाहन करण्यात आलेले आहे. याबाबतची माहिती आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैसास केंद्रे यांनी दिली.