एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात गुरुवारी (दि. 25) अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. पाण्यात अडकलेल्या 25 जणांची वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी सुटका(Maval) केली.
मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे नद्यांना पूर आला होता. त्यात गुरुवारी पावसाने कहर केला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला. त्यानंतर पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला पाचारण करण्यात(Maval) आले.
संस्थेच्या सदस्यांनी चांद मुल्ला, रियाज मुल्ला, अय्यज मुल्ला, मोहम्मद अलीम मुल्ला, नाजमीन मुल्ला, रेश्मा मुल्ला, मेहबूब शेख, समीर शेख, इब्राहिम शेख, तसलीम शेख, अक्षा शेख (वय 6), कबीर शेख (वय 4), काशिंबीर शेख, दावल मुल्ला, सलीम मुल्ला, हिना मुल्ला, मेहबूब बी, रेहान शेख (वय 15), आराम शेख (वय 2) यांची सुटका केली.
PCMC : मोफत इंजीनियरिंग आणि ऑटोमेशन डिप्लोमामुळे मुली होणार सक्षम
त्यानंतर वाडोळे येथील मंदिरात राहणारे शिवानंद गिरी महाराज (वय 60, रा. कासारवाडी) यांची सुटका केली. वाडोळे येथील रवी हेगडे यांच्या बंगल्यावर केअर टेकर म्हणून काम करणारे परशुराम शामराव घालेवाड (वय 38, रा. बीड), रेखा परशुराम घालेवाड (वय 28, रा. बीड), रागिणी परशुराम घालेवाड (वय 10), अथर्व परशुराम घालेवाड (वय 7), सुरेश चौधरी (वय 56, रा. झारखंड) यांची सुटका केली.