एमपीसी न्यूज – श्रीलंकेने महिला आशिया चषकचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. आज दि.(28 जुलै) रोजी श्रीलंकेतील डम्बुला मैदानावर य झालेल्या अंतिम फेरीत भारताचा 8 गडी राखून पराभव केला.
याबाबतची माहिती अशी मिळत आहे की,आज झालेल्या अंतिम फेरीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताची स्टार खेळाडू स्मृती मंधानाने अर्धशतक तर जेमिमाह रोडीग्ज 29 आणि रिचा घोषच्या 30 धावांच्या जोरावर श्रीलंकेला 166 धावांचे लक्ष्य दिले.
Paris Olympics 2024 : भारताने उघडलं खातं; मनु भाकरने घडवला इतिहास, कांस्य पदकावर कोरलं नाव
श्रीलंकेने 19 षटकामध्ये फक्त 2 फलंदाज गमावून 166 धावांचे लक्ष्य गाठत गेल्या 24 वर्षांत पहिल्यांदा आशिया कप जिंकला आहे. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे श्रीलंकेमध्ये क्रिकेटरसिकांमध्ये प्रचंड प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे.