एमपीसी न्यूज – किवळेगाव स्मशानभूमीची दुरवस्था (Kiwale) झाली आहे. मुख्य शेड तुटले आहेत. त्यामुळे आरसीसी शेड बांधण्याची मागणी शिवसेनेचे युवा सेनेचे मावळचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस यांनी केली आहे.
यावेळी माजी नगरसेवक प्रमोद कुटे, निलेश बारणे उपस्थित होते. याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, किवळे गावातील स्मशानभूमीचे मुख्य शेड मधील सर्व चॅनल तुटले आहेत. त्यामुळे अपघात होऊन नागरिकांच्या जीवितास हानी पोहोचू शकते. कारण 16 ऑगस्ट रोजी एका मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सर्व नागरिक बाहेर गेले. त्यावेळी स्मशानभूमीच्या छताचे अँगल खाली पडला. सुदैवाने त्या ठिकाणी कोणीच नागरिक नव्हते. आणखी काही अँगल पडण्याच्या अवस्थेत आहेत.
Chinchwad : रक्षाबंधनासाठी भावाकडे निघालेल्या बहिणीचे दागिने चोरीला
हे अँगल केव्हाही पडू शकतात. त्याचप्रमाणे किवळे विकासनगरचे शहरीकरण लोकसंख्या पाहता सध्या अंत्यविधी जाळी दोन असल्याने त्या दोन जाळ्या अपुऱ्या पडतात. अनेक वेळा गैरसोय निर्माण झालेली आहे. त्या ठिकाणी चार ते पाच अंत्यविधी जाळी व विद्युत दाहिनी उपलब्ध करून द्यावी. सद्यस्थिती सदर स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय आहे. त्या ठिकाणी केस कर्तनालय (Kiwale) कट्टा व्यवस्थित नाही. विसावा कट्टा व्यवस्थित नाही. नागरिकांना बसण्याची व्यवस्था खुर्ची बेंच नाही. माइकव्यवस्था नाही अशा प्रकारे खूप मोठी दुरवस्था किवळे स्मशानभूमी मध्ये आहे. त्यावर आयुक्तांनी RCC स्मशानभूमी करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.