Pune : मनुवादाच्या विचारांना संपवायचे तर ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या विचारांनीच उत्तरे द्यावी लागतील – शरद पवार

एमपीसी न्यूज : देशात आता प्रतिगामी विचार वेगवेगळ्या माध्यमातून प्रसृत होताना दिसत आहेत. राजस्थानमधील एका न्यायालयाच्या समोर मनुचा पुतळा बसविण्यात आला आहे. न्यायालयाच्या समोर मनुचा पुतळा बसविण्याचे काम राज्यकर्ते करतात. याचाच अर्थ मनुवादाचा विचार अजुन पर्यत समाजातील अधिकार पदावर असलेल्यांच्या डोक्यातून गेलेला नाही. मनुवादाच्या हा विचारांना संपवायचे असेल तर ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या विचारांनीच उत्तरे द्यावे लागतील, असे परखड मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्यावतीने 128 वी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिन साजरा करण्यात आला. यावेळी पवार यांना महात्मा फुले समता पुरस्कार पवार यांना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गंज पेठेतील महात्मा फुले यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमाला देवीसिंग शेखावत, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ, सीतामढीचे खासदार रामकुमार शर्मा, महापौर मुक्ता टिळक, वंदना चव्हाण, पंकज भुजबळ, समीर भुजबळ, आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.