Pune : ‘केपीआयटी ‘आणि ‘ज्ञान प्रबोधिनी’आयोजित ‘छोटे सायंटिस्टस्’ स्पर्धेचा समारोप
एमपीसी न्यूज- ‘केपीआयटी ‘ टेक्नॉलॉजीस लिमिटेड आणि ‘ज्ञान प्रबोधिनी’आयोजित ‘छोटे सायंटिस्टस्’ स्पर्धेचा समारोप नुकताच करण्यात आला. विजेत्या शाळांना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष होते.
या उपक्रमात ‘वी -सॉल्व्ह ‘ ही समस्या परिहार स्पर्धा होती, त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक परिसरातील समस्या देऊन त्यावर वैज्ञानिक उत्तर शोधण्याचा प्रकल्प करण्यास सांगण्यात आले होते. विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, स्कुलबॅग व विजयी शाळांना ट्राफी देण्यात आली .
पुणे मनपा क्षेत्रातील इयत्ता 8 वी गटात प्रथम क्रमांक संत नामदेव माध्यमिक विद्यालय ( महर्षीनगर पुणे ), दुसरा क्रमांक राजीव गांधी ई लर्निग स्कूल (सहकार नगर), तृतीय क्रमांक यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय( बिबवेवाडी) यांना मिळाला. पिंपरी -चिंचवड मनपा गटात प्रथम क्रमांक पिंपरी – चिंचवड मनपाचे थेरगाव स्कूल, द्वितीय क्रमांक पिंपरी -चिंचवड मनपाचे पिपळे गुरव स्कूल यांना मिळाला .
इयत्ता 8 वी गटात मावळ व मुळशी विभागातून प्रथम क्रमांक संत तुकाराम विद्यालय ( शिवणे) दुसरा क्रमांक श्रीराम विद्यालय (नवलाख उंबरे),तिसरा क्रमांक स्व बाबूराव रायरीकर माध्यमिक विद्यालय(उरवङे) यांना मिळाला .
इयत्ता 9 वी गटात प्रथम क्रमांक ग्राम प्रबोधिनी विद्यालय( साळुम्बरे ).दुसरा क्रमांक पंचक्रोशी विद्यालय (दारूब्रे) तृतीय क्रमांक व्हिजन इंग्लिश स्कूल (न-हे आंबेगाव ) यांना मिळाला .
अटल टिंकरिंग लॅब ‘ असलेल्या शाळांच्या ‘छोटे सायंटिस्टस् ‘ स्पर्धेत एसपीएम स्कूलचा प्रथम क्रमांक आला. द्वितीय क्रमांक मिलेनियम नॅशनल स्कूल (पुणे ) तर तृतीय क्रमांक सुंदराबाई राठी स्कूल (पुणे) यांनी पटकावला .
किशोर पाटील (व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ,केपीआयटी उद्योग समूह ), पिंपरी -चिंचवड मनपा माध्यमिक शिक्षण अधिकारी पराग मुडे, डॉ. सारिका केळकर, राहूल उपलप, संत रंजन ( टीम लिङर ,केपीआयटी) प्रकाश रणनवरे (स्पर्धा समन्वयक ) यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
13 फेब्रुवारी रोजी पुण्यात झालेल्या या स्पर्धेत मावळ -मुळशी तालुक्यातील 20 शाळा, पुणे महानगर क्षेत्रातील 10 शाळा ,पिंपरी -चिंचवड क्षेत्रातील 8 शाळा अशा 38 शाळा आणि 200 विद्यार्थी सहभागी झाले. 14 फेब्रुवारी रोजी ‘अटल टिंकरिंग लॅब’च्या 16 शाळा आणि 100 विद्यार्थी सहभागी झाले .
किशोर फडतरे, तुषार जुवेकर (केपीआयटी ) यांनी स्पर्धा संयोजन केले. प्रणव पुजारी यांनी सूत्रसंचालन केले . केपीआयटीच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख राजेश सिंग, परेश शिंदे, गणेश भताणे, विशाल गायकवाङ, अक्षय कुलथे, प्रशांत दिवेकर उपस्थित होते .
2012 मध्ये 20 शाळांमध्ये 800 विद्यार्थ्यांमध्ये सुरु झालेला हा उपक्रम 177 शाळा आणि 15 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. भारतातील 20 शहरांमध्ये हा उपक्रम पोहोचला आहे.