India Corona Update: दिलासादायक ! देशातील 90 लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त
एमपीसी न्यूज – भारतात कोरोनाचा शिरकाव होऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. जगात सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशात भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असले तरी देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 90 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत देशभरात 36 हजार 594 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 95 लाख 71 हजार 559 एवढी झाली आहे. त्यापैकी 90 लाख 16 हजार 289 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 4 लाख 16 हजार 082 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
With 36,594 new #COVID19 infections, India's total cases rise to 95,71,559
With 540 new deaths, toll mounts to 1,39,188. Total active cases at 4,16,082
Total discharged cases at 90,16,289 with 42,916 new discharges in the last 24 hrs pic.twitter.com/lOpCRoNQrv
— ANI (@ANI) December 4, 2020
मागील 24 तासांत देशभरात 540 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत देशात 1 लाख 39 हजार 188 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले असून, देशातील मृत्यूचे प्रमाण 1.45 टक्के एवढं आहे. देशात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून, मागील 24 तासांत 42 हजार 916 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 94.19 टक्के एवढा आहे.
देशात चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. मागील 24 तासांत देशभरात 11 लाख 70 हजार 102 नमूने तपासण्यात आले आहेत. देशातील एकूण चाचण्यांची संख्या 14 कोटी 47 लाख 27 हजार 749 एवढी झाली आहे. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.
Total number of samples tested up to 3rd December is 14,47,27,749 including 11,70,102 samples tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/yyjOOsrpZk
— ANI (@ANI) December 4, 2020
मागील काही दिवसात नव्यानं वाढ होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून देशाचा रिकव्हरी रेट 94.19 टक्के एवढा आहे हे देशासाठी ही दिलासादायक बाब असल्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, केरळ, राजस्थान, गुजरात आणि तमिळनाडू या राज्यांत नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे.