Pune News : वाचाळ बडबड करणार्‍यांना ही जबरदस्त चपराक : अजित पवार

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रात एक वेगळा प्रयोग शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी केला. त्याचं हे यश आहे. वाचाळ बडबड करणार्‍यांना ही जबरदस्त चपराक आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. सुशिक्षित तसेच शिक्षक मतदारांनी आम्हाला निवडून दिले. तीन पक्ष एकत्र येण्याचा फायदा होतो हे सिद्ध झाले आहे. आम्ही एकटे यायचं की आघाडी करून यायचे हे आमचे वरिष्ठ ठरवतील. आम्हाला कोणी सल्ला द्यायचं कारण नाही.

आगामी काळात जास्तीत जास्त एकत्र येऊन आघाडी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या वेगळं लढण्यानं विरोधकांचं फावणार असेल तर तसं व्हायला नको. अमरावतीची जागा आली असती तर आणखी आनंद झाला असता. तिथं जे घडलं त्याचं दुःख आहे. आम्ही पराभव स्वीकारतो आणि चिंतन करतो, अशी भूमिका चंद्रकांत दादांनी करणे अपेक्षित होते. मात्र ते दावे करीत आहे, असा टोमणाही त्यांनी यावेळी लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.