Alandi : आजोबांचा सांभाळ करण्यावरून नातवांमध्ये वाद

एमपीसी न्यूज – आजोबांचा सांभाळ करण्यासाठी कोणाकडे ठेवायचे? या कारणावरून नातवांमध्ये भांडण झाले. दोन भावांनी मिळून दोन चुलतभाऊ आणि चुलत्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. ही घटना सोमवारी (दि. 23) दुपारी साडेतीनच्या सुमारास आळंदीमधील घासवाले धर्मशाळा येथे घडली.

याप्रकरणी अक्षय संभाजी भोरे (वय 25, रा. बदलापूर पूर्व, ता. अंबरनाथ, जि. ठाणे) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मनोज गंगाधर भोरे, सिद्धांत गंगाधर भोरे (दोघे रा. घोरपडी कलाशंकर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे आजोबा रामकृष्ण भोरे यांचा सांभाळ कोणी करायचा? यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. आरोपी मनोज आणि सिद्धांत यांनी फिर्यादी अक्षय, त्यांचा भाऊ दिगंबर आणि वडिलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.