Har Ghar Tiranga Campaign: आळंदीत हर घर तिरंगा जनजागृतीसाठी प्रभातफेरी

एमपीसी न्यूज: आळंदी नगरपरिषद व शिक्षण विभाग आळंदी यांच्या वतीने आळंदी शहरात देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त (Har Ghar Tiranga Campaign) हर घर तिरंगा जनजागृती साठी दि.10 ऑगस्ट रोजी प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला.

आळंदी नगरपरिषदेच्या विविध शाळेच्या जवळ असणाऱ्या भागात ढोल ताश्याच्या वाद्यात ,लेझीम खेळासह,विद्यार्थ्यांनी हातात झेंडा घेत, हर घर झेंडा, (Har Ghar Tiranga Campaign) वंदे मातरम,भारत माता की जय अशा घोषणा देत प्रभातफेरी काढली. यावेळी प्रथम शिक्षकांनी नगरपरिषदे समोर जमलेल्या विद्यार्थी व नागरिकांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या  अभियानाची माहिती देत मुलांसाठी शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धां विषयी माहिती दिली.

या प्रभात फेरी वेळी आळंदी नगरपरिषदेचे कार्यालयीन आधिकारी किशोर तरकासे साहेब तसेच आळंदी नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी वर्ग व आळंदी नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांसह, शिक्षक वर्ग उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.