MPC News Impact :… आणि हरवलेले आजोबा सुखरुप पोहोचले आपल्या घरी
एमपीसी न्यूज – स्मृतीभ्रंश या आजाराने ग्रस्त असलेले एक आजोबा आपल्या राहत्या घरातून बाहेर पडले. भटकत भटकत ते मुंबई – पुणे महामार्गावर फिरताना कामशेत येथील किनारा वृद्धाश्रमच्या कर्मचाऱ्यांना दिसले. त्यांच्या पायाला इजा झाली होती तसेच, घर आणि आप्तेष्ट यांच्याबद्दल त्यांना जास्त माहिती आठवत नव्हती. किनारा वृद्धाश्रमच्या संचालिका प्रिती वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एमपीसी न्यूज’ने याबाबत बातमी करत आजोबांच्या नातेवाईकांना त्यांना घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. अखेर या आजोबांचा मुलगा व मुलीने वृद्धाश्रमला भेट देऊन आपल्या वडिलांना परत घरी नेले आहे.