Anurag gave advise to Kangana – अनुराग कश्यपचा कंगनाला मोलाचा सल्ला…

एमपीसी न्यूज – अभिनेत्री कंगना रानावत आणि वाद असे आता नवीन समीकरण झाले आहे. आपल्या आचरट बोलण्याने मुद्दाम वाद उकरुन काढण्यात कंगना यशस्वी होत होती. पण आजकाल तिला देखील पलटवार झेलावे लागत आहेत. बॉलिवूडमधील ड्रग्सच्या मुद्द्यावरूनही ती चर्चेत राहिली.

‘देशाच्या सन्मानासाठी मी ने हमीच आवाज उठवेन’, अशा आशयाचं एक ट्विट कंगनाने केलं होतं. त्यावरुन दिग्दर्शक अनुराग कश्यपने तिची थट्टा केली. ‘एक काम कर, तू चार-पाच जणांना घेऊन भारत-चीन सीमेवर लढायला जा’, असा उपरोधिक सल्लाच अनुरागने कंगनाला दिला.

‘मी क्षत्रिय आहे. सर कटा सकती हूं, शिरच्छेद करु शकते मात्र नतमस्तक होऊ शकत नाही. देशाच्या सन्मानासाठी मी नेहमी आवाज उठवेन. मान, सन्मान आणि स्वाभिमानासह मी जगतेय आणि गर्वाने राष्ट्रवादी म्हणून जगत राहीन. माझ्या नीतीमूल्यांशी मी कधीच तडजोड केली नाही आणि कधी करणारही नाही. जय हिंद!’, असं ट्विट कंगनाने केलं होतं.

त्यावरुन दिग्दर्शक अनुराग कश्यपने तिची थट्टा केली. ‘एक काम कर, तू चार-पाच जणांना घेऊन भारत-चीन सीमेवर लढायला जा’, असा उपरोधिक सल्लाच अनुरागने कंगनाला दिला. ‘फक्त तूच एक आहेस बहीण- एकमेव मणिकर्णिका. चार- पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर जा. त्यांना पण हे दाखवून दे की जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत या देशाचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. तुझ्या घरापासून एलएसीपर्यंत फक्त एका दिवसाचा प्रवास आहे’, असा उपरोधिक सल्ला अनुरागने कंगनाला दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.