Pimpri : रिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र व्हावे – बाबा कांबळे

एमपीसी न्यूज – प्रत्येक रिक्षा स्टॅन्डवर पाणपोई, वाचनालय, फोनबुकिंग केंद्र, सेवा केंद्र अशा सुविधा द्याव्यात तसेच रिक्षा स्टॅन्डवर येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना चांगली प्रवासी सेवा द्यावी, अशा प्रकारे चांगली सेवा आणि इतर अन्य सुविधा देऊन पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक रिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र झाले पाहिजे यासाठी रिक्षा चालकांनी प्रयत्न करावेत असे आव्हान महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी रिक्षा चालकांना केले. 

चिंचवड प्रेमलोक पार्क येथे प्रेम लोक रिक्षा स्टॅन्डच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न प्रेम लोकपार्क रिक्षा स्टँडचे उद्घाटन नुकतेच बाबा कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे, वाकड विभाग अध्यक्ष गफूर शेख, विभाग अध्यक्ष अजित बराटे, कुदरत खान, ज्येष्ठ नागरिक रमेश केळकर, सदाशिव पवार, सुनिल चिंचवडे, सुधीर अगवणे, विजय कोरपे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन स्टँड अध्यक्ष दीपक खंडागळे, मधू नागवेकर, अकलम शेख, शिवाजी कवडे, गणेश भागात, अफसर भालदार, शंकर खंडागळे, विनोद कळलीगपूर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

यावेळी बाबा कांबळे म्हणाले, रिक्षा चालकांबद्दल अनेक गैरसमज आहेत. तसेच रिक्षा व्यवसायात स्पर्धा आहेत. यामुळे रिक्षा व्यवसाय हा चिकाटीने करावा या बरोबरच रिक्षा चालकांची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची घोषणा झाली आहे. रिक्षा चालकांना सामाजिक सुरक्षा मिळेल हे लाभ घेत असताना रिक्षा चालकांनी “सेवा हाच धर्म” मानून काम करावे रिक्षा स्टॅन्ड समाजसेवा केंद्र करावे असे बाबा कांबळे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.