Bangalore-Mumbai Highway : वेगात दुचाकी चालविल्याने झाला अपघात; मित्राचा गेला जीव

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जाताना वेगात दुचाकी चालविल्याने दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या तरूणाचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 18) मध्यरात्री अडीचच्या सुमारास बंगळुरू -मुंबई महामार्गावर (Bangalore-Mumbai Highway) सुसखिंड येथे घडला.

अभिषेक नवनाथ कदम (वय 23, रा. हिंजवडी) असे मृत्यू झालेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. तर, चालक शुभम संजय कांबळे (वय 23, रा. कोथरूड) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार तानाजी महादू टकले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chikhali : मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याची धमकी देत वृद्धाला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम कांबळे आणि त्याचा मित्र अभिषेक कदम रविवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास बंगळुरू-मुंबई महामार्गावरून (Bangalore-Mumbai Highway) जात होते. शुभम हा दुचाकी चालवत होता. तर अभिषेक हा पाठीमागे बसला होता. शुभमने दुचाकी बेदरकारपणे अतिवेगात चालवली. त्यामुळे सुसखिंड येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकींचा अपघात झाला. यात अभिषेकचा मृत्यू झाला असून शुभम हा गंभीर जखमी झाला आहे. शुभमवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.