Bhosari : माहुली किल्ला व तानसा अभयारण्यात पर्यावरण जनजागरण व प्लास्टिक मुक्त अभियान

एमपीसी न्यूज- भूगोल फाउंडेशन संस्थेच्या वतीने नुकतेच किल्ले माहुली आणि तानसा अभयारण्य येथे पर्यावरण जनजागरण व प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले. यावेळी स्थानिक लोकांमध्ये याबाबत जनजागृती, प्रबोधन करण्यात आले.

सर्वप्रथम माहुली गावामध्ये व वनविभागाच्या सहकार्याने पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी पत्रके वाटण्यात आली. किल्ले माहुलीच्या पायथ्याशी कायमस्वरूपी किल्ल्याचे आत्मवृत्त, प्रदूषण, पर्यावरण याविषयीचा फलक लावण्यात आला. त्याचवेळी स्थानिक लोकांना पर्यावरण व स्वच्छता याविषयी ठाणे जिल्हा उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे पाटील व भूगोल फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल वाळुंज यांनी प्रबोधन केले. तसेच खर्डी येथील मठाचे स्वामी स्वरुपानंद यांनी सर्वांना मार्गदर्शन व शुभेच्छापर आशिर्वाद दिले.

वेळी झाडांना सलाईन लावण्याचे फायदे सांगण्यात आले. वन्यजीव प्राणी यांचे निसर्गातील जीवनचक्र याविषयी माहिती सांगण्यात आली. गड परिसरामध्ये साफसफाई करण्यात आली. या मोहिमेत प्लॅस्टिक, बा्ॅटल व अविघटनशिल कचरा गोळा करण्यात आला. कड्याकपारीत, झाडाझुडपात जाऊन कचरा गोळा करण्यात आला. पर्यावरण रक्षण व्हावे, ऎतिहासिक वास्तुचे जतन व्हावे या भावनेने ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 6 पोती प्लॅस्टिक व थर्माकोल सदृश अविघटनशील कचरा गोळा करण्यात आला. यावेळी वन्यजीव विभाग, संतनगर मित्र मंडळ, इंद्रायणी सेवा संघ, वनसेवा समिती माहुलीगड व इतर सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या.

भूगोल फाउंडेशनच्या वतीने शिवनेरीपासून सुरु झालेले हे कार्य दोन वर्षे चालू आहे. या मोहिमेत ठाणे जिल्हा वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे पाटील व सहाय्यक वनसंरक्षक पी एल मते, मुरबाडचे उद्योजक सुरज परदेशी, स्वामी स्वरुपानंद , वनक्षेत्रपाल दर्शन ठाकूर, वनविभागाचे वनपाल डी एम वायंदणकर, वनपरिमंडळ आसनगावचे वनरक्षक एस् एल कोळी, एस् आर राठोड, जे आर गायकवाड, जे ए पाटील व एच पी ठाकरे, तसेच सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. भूगोल फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल (नाना) वाळूंज, सुनील काटकर, बाळासाहेब गरुड, गणेश चै्ाधरी, अरविंद देवकर, चव्हाण सुहास, संभाजी माने, निलेश माळी, संदीप चौधरी, ठाकूर संतोष, राहुल शिंगोटे, आदेश गरुड, विजय सुतार, समीर कालेकर व त्यांचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

संतनगर मित्र मंडळ व इंद्रायणी सेवा संघाचे जगन्नाथ माने, साहेबराव गावडे, शशिकांत वाडते, हभप सतीश महाराज वाळुंज, गोरक्ष आदक, बंडू येरावार,विशाल शेवाळे, सुरेश येरावार, सत्यवान जाधव, अाद्याप्रसाद यादव, ठाकूर सुरज, कृष्णा चै्ाधरी ,शेळके विजय, ओंकार मराठे, विकास मराठे व त्यांचे इतर सहकारी, अशा संस्था व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.