Bhosari : किरकोळ वादातून रिक्षाचालकाचा खून

एमपीसी न्यूज – किरकोळ वादातून रिक्षा चालकावर चाकूने वार करून खून करण्यात आला. ही घटना भोसरी एमआयडीसी मधील फुलेनगर येथे आज (शुक्रवारी) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली.

दयाराम शितलाप्रसाद गिरी, बाबूराम शितलाप्रसाद गिरी आणि जय प्रकाश कृष्णा गिरी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तर विनोद माताफेर गिरी असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद आणि आरोपी एकाच गल्लीत राहतात. विनोद रिक्षाचालक होते. आज मध्यरात्री विनोद उशिरा घरी आले. त्यांचा रिक्षाचा आरोपींच्या दारासमोर असलेल्या पाण्याच्या ड्रमला धक्का लागला. यावरून आरोपींनी त्यांच्यासोबत वाद घातला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होते.

रात्री वाद विकोपाला जाऊन आरोपींनी विनोदवर चाकूने वार केले. यामध्ये विनोद गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यामध्ये विनोद यांचा मृत्यू झाला. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.