Bhosri : 23 वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल, काव्यलेखन स्पर्धा आणि पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : भोसरी (Bhosri) येथे 23 वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व 23 वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण आणि विविध पुरस्कार वितरण सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम नक्षत्राचं देणं काव्यमंच यांच्या वतीने धोडींबा फुगे मैदान सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे उदघाटन रत्नागिरीचे ज्येष्ठ समाजसेवक, अभियंता वसंत टाकळे यांच्या शुभहस्ते झाले. वृक्षपूजन करुन झाडाला पाणी घालून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने पर्यावरणाचा संदेश देत उदघाटन सोहळा संपन्न झाला.

हा कार्यक्रम भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षांनिमित्त व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२५ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी, साहित्यिक व शिक्षणतज्ञ उदय सर्पे (सिंधुदुर्ग), नक्षत्राचं देणं काव्यमंच राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे (कवी वादळकार), सुप्रसिद्ध उद्योजक विजयशेठ फुगे, उद्योजक योगेश आमले, प्रा.शंकर घोरपडे, कविवर्य अलका नाईक (मुंबई), युवा उद्योजक अमर फुगे, प्रा.दिलीप गोरे, गणेश डबडे, प्रा.डाॅ.राजेंद्र झुंजारराव, रामदास घुंगटकर, साईराजे सोनवणे, रामचंद्र पंडित इ. मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी उदय सर्पे (Bhosri) म्हणाले की, “कवींनी आपल्या कवितेची साधना करावी. शब्दांचा आविष्कार प्रभावी मांडून प्रतिभा फुलवत ठेवावी. हक्काच्या व्यासपीठासाठी कवींनी ‘नक्षत्राचं देणं’ काव्यमंच परिवाराशी जोडावे. कवींनी सुंदर जग आहे हे सांगण्याचे काम केलेले आहे. आजच्या काळातील आधुनिक संत कवी आहेत.”

यावेळी कवी रामचंद्र पंडित (सातारा) यांना समाजसेवक सावळेराम रखमाजी डबडे कविरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, सोळाव्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक व्यासपीठ(नाशिक), द्वितीय क्रमांक मोडीदर्पण (मुंबई), तृतीय क्रमांक शब्दाई (पुणे) यांनी यश संपादन केल्याबद्दल गौरविण्यात आले. नक्षत्र गौरव पुरस्कारही यावेळी पुढील मान्यवरांना देण्यात आला. त्यात कवयित्री वृषाली टाकळे (रत्नागिरी), कवी यशवंत घोडे (जुन्नर), कविवर्या प्रा.शितल कांडलकर(नागपूर), कवी मोहन अप्पा घुले (भोसरी), कवी यवनाश्व गेडकर(चंद्रपुर), कविवर्या पुष्पलता कोळी (जळगाव), कवी प्रा.डाॅ.सत्येंद्र राऊत (उस्मानाबाद), कवी डाॅ. लक्ष्मण हेंबाडे (सोलापूर), कविवर्या छाया ब्रम्हवंशी (गोंदिया), कविवर्या प्रा.अरुणा डांगोरे (नागपूर), कविवर्य ज्ञानेश्वर काजळे (जुन्नर), कवी मंदार सांबारी (मालवण), कविवर्या भारती तितरे (गडचिरोली), कविवर्य प्रा.दिलीप गोरे (चाकण) यांना सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सर्वांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी केले. आभार प्रदर्षण रामदास हिंगे यांनी मानले. यावेळी 23 व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेला यावर्षी 375 कवितांतून पुढील कवींनी यश संपादन केले. त्यात प्रथम क्रमांक अलिबागच्या कविवर्या संध्या ठाकूर यांना, द्वितीय क्रमांक पुण्याचे कविवर्य डाॅ.राजेंद्र झुंजारराव तर तृतीय क्रमांक रत्नागिरीच्या कविवर्या वृषाली टाकळेयांना देण्यात आला.

Pune Shramik Patrakar Sangh : विद्यार्थ्यांचा गृहपाठ हे पालकांचे कर्तव्य, ते रद्द करू नका 

यामध्ये पहिले उत्तेजनार्थ चिंचवडमधील कविवर्य भाऊसाहेब आढाव, दुसरे उत्तेजनार्थ नागपूरच्या कविवर्या निर्मला जीवने यांना तर तिसरे उत्तेजनार्थ अहमदनगरचे कविवर्य रामदास अवचर यांना (Bhosri) देण्यात आले.

कार्यक्रमाच्या संयोजनात मोहन कुदळे, पियुष काळे, प्रमोद डोंगरदिवे, गणेश डबडे, रामदास हिंगे, प्रीती सोनवणे, अप्पा घुले, यशवंत घोडे, डाॅ.अलका नाईक, दिव्या भोसले, यशवंत गायकवाड, अनिता बिराजदार इ. नी पुढाकार घेतला. राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफलमध्ये 75 कवींनी कविता सादर करुन काव्यमैफल रंगविली. या मैफलमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, उस्मानाबाद, गडचिरोली, सोलापुर, जळगाव, नाशिक, मुंबई, ठाणे, मालवण, चाकण, जुन्नर, खेड, चिंचवड, कात्रज, कणकवली, चिखली, भोसरी, आळे, पिंपरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, इ. भागातील अनेक कवींनी सहभाग घेतला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.