Pune News : भाजपमुळेच मराठा आरक्षणातील क्लिष्टता वाढली : गोपाळ तिवारी
आरक्षणाची 50% मर्यादा उल्लंघत असताना, ‘विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती’ विषद करूनच ‘न्यायमूर्तीं गायकवाड कमिशन’ने सादर केलेला (शिफारसींचा 1400 पानी) अहवाल रणजीत मोरे व भारती डांगे यांच्या खंडपीठाने मान्य व गृहीत करून ‘मराठा समाजास आरक्षण मंजूर केले’ होते.
त्यामुळे एकंदरच केंद्राने 102वी घटना दूरूस्ती करून मराठा आरक्षण प्रक्रियेत आवश्यकता नसताना ‘दखलपात्र’ – मुद्दा’ उपस्थित केला गेला असल्याचे मत आणि खंत व्यक्त केली आहे.