Bollywood- अभिनेत्री तब्बूचे लग्न न होण्यामागे आहे ‘हा’ अभिनेता

Actress Tabu is not getting married

 एमपीसीन्यूज : ‘रुक रुक रुक, अरे बाबा रुक,’ असे म्हणत अजय देवगणला साद घालणारी ‘विजयपथ’मधली खट्याळ तब्बू आपल्याला नक्कीच आठवत असेल. तो तिचा पहिलाच चित्रपट होता आणि त्यात तिचा हिरो अजय देवगण होता. नंतर त्या दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तसेच त्यावेळी त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. पण अजयने काजोलशी लग्न करताच या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला. तब्बू मात्र आजही अविवाहित आहे. मात्र तब्बूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अजयमुळे लग्न न झाल्याचा खुलासा केला आहे.

तब्बूने नुकतीच ‘मुंबई मिरर’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आत्तापर्यंत सिंगल असण्यामागचे कारण सांगितले आहे. ‘मी अजयला गेल्या २५ वर्षांपासून ओळखते. अजय माझा चुलत भाऊ समीरच्या शेजारी राहायचा आणि त्या दोघांमध्ये चांगली मैत्री होती.

त्यामुळे आम्ही एकत्र लहानाचे मोठे झालो आणि आमच्यामध्ये चांगली मैत्री देखील होती. जेव्हा मी तरुण होते तेव्हा समीर आणि अजय माझ्यावर लक्ष ठेवायचे. मी जिकडे जाईन तिकडे माझा पाठलाग करायचे आणि जर एखाद्या मुलाने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर हे दोघेही त्याला मारण्याची धमकी द्यायचे.
हेच मी आज सिंगल असल्याचे कारण आहे. कारण अजयमुळे माझे लग्नच होऊ शकले नाही’, असा गंमतीशीर खुलासा तब्बूने केला आहे.

त्यानंतर तब्बूला तू लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने मजेशीर अंदाजात उत्तर दिले आहे. ‘मी अजयला सांगितले होते मला लग्नासाठी एक मुलगा बघ’ असे तब्बू म्हणाली.

तब्बू आणि अजयने आतापर्यंत ‘विजयपथ’, ‘हकीकत’, ‘तक्षक’, ‘दृश्यम’, ‘गोलमाल अगेन’, ‘दे दना दन’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.