Break the chain : अत्यावश्यक वस्तूंची दुकाने 7 ते 11 खुली राहणार ; ‘अशी’ आहे नवीन नियमावली
सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत डोम डिलिव्हरी
एमपीसी न्यूज – राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश ), कृषि उत्पादनाशी संबंधित दुकाने सकाळी 7 ते 11 वेळेत सुरु राहतील.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावाखाली नागरिक दिवसभर बाहेर फिरत आहेत. त्यामुळे किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
🚨🚨
Some new additions to the guidelines. Please do read and share.#BreakTheChain pic.twitter.com/OUJt8MXOpp— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 20, 2021
राज्यातील सर्व किराणा, भाजी, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह), कृषि उत्पादनाशी संबंधित दुकाने , पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच सुरू राहतील.
मात्र या दुकानांना सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत होम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेतील.