Pune : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांची केलेली कर्जमाफी ही फसवणूक – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी दोन लाखांची केलेली कर्जमाफी ही फसवणूक असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली. पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. राज्य शासनाने दोन लाखांची कर्जमाफी केली आहे. मात्र, २००१ ते २०१६ या कालावधीतील दोन लाखापर्यंतचं कर्ज असलेला शेतकरीच कर्जमाफी देण्यासाठी राहिलेला नाही. आता केवळ दोन लाखांवरचे शेतकरी राहिले आहेत. यांना कर्जमाफी दिली जाणार नाही. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजे फसवणूक असल्याचे पाटील यांनी सांगितले.

तर, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांची नाराजी पक्षावरील नाही. एखाद्या व्यक्ती किंवा घटना यांच्याबद्दल आहे. ती दूर करण्यात येणार आहे. आमच्या नेत्यांची काळजी पक्ष घेईल, त्यांना कोणी ऑफर देत असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षातील लोकांची काळजी घ्यावी, असे आवाहनही पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.