Chinchwad : हिंदुद्रोही आणि देशविरोधी घटनांवर अंकुश लावावा; विश्व हिंदू परिषदेचे पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर

एमपीसी न्यूज – मागील काही वर्षांपासून अलगाववादी मानसिकतेच्या माध्यमातून इस्लामिक जिहादी संघटनेद्वारे चालविल्या जाणाऱ्या हिंदूद्रोही आणि देशविरोधी जिहादी गतीविधीमुळे देशात हिंदू समाज आणि हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर अनेक हल्ले होत आहेत. तसेच सामूहिक हत्येच्या घटनांना त्या खूप मोठ्या आहेत, असे भासवून सर्वसामान्य नागरिकांना, गोरक्षकांना, श्रीराम भक्त तसेच अन्य राष्ट्रभक्तांना बदनाम करण्याचे षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रकार थांबविण्यात यावेत, यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के .पद्मनाभन यांना निवेदन देण्यात आले.

विश्व हिंदू परिषदेकडून पोलीस आयुक्त यांना निवेदन देताना बजरंग दल प्रांत संयोजक लहुकुमार धोत्रे, विभाग मंत्री नंदकुमार कुलकर्णी, विभाग संयोजक संदेश भेगडे, विभाग सह संयोजक कुणाल साठे, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर, जिल्हा सह मंत्री संजय शेळके, जिल्हा बजरंग दल संयोजक नाना सावंत, बजरंग दल सह संयोजक सागर चव्हाण, अभिजित शिंदे, संभाजी बालघरे, मयूर काटे, महेश बालघरे, स्वप्नील नखाते आणि विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

  • विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात हिंदू भगिनींसोबत इस्लामिक जिहाद्यांची पशुवत क्रुरता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यामुळे संपुर्ण देशाला शरमेने मान खाली घालावी लागत आहे. जिहादी आतंकवाद, लव जिहाद, हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतरण, काश्मिरी अलगाववाद, केरळ, बंगाल, कर्नाटकातील हिंदूंवर होणारे सततचे हल्ले व हिंदूंचे पलायन, दिल्लीतील व्यावसायिक केंद्र असलेल्या चांदणी चौक परिसरातील हिंदू मंदिराची व मंदिरातील मूर्तीची तसेच हिंदूंच्या घरांची केलेली तोडफोड, सुरत, रांची, जयपूर येथे देशाच्या विरोधात हिंसक प्रदर्शन यांसारख्या घटनांमुळे सध्या हिंदू समाज आक्रोशीत आहे.

देशभरात चोरी, गो-हत्यारे, गो-तस्कर व पेशेवर हल्लेखोर या सर्वांना वाचविण्यासाठी अथवा यांच्या कुकर्मावर पडदा टाकण्यासाठी योजनाबद्ध रीतीने हिंदू आस्था असलेल्या केंद्रांना निशाणा बनवण्यात येत आहे. हिंदू समाजाचा मानबिंदू असलेल्या ‘जय श्रीराम’ या घोषणेचा दुरुपयोग केला जात आहे. या सर्व गोष्टींना कथित धर्मनिरपेक्षतावादी हेतू पुरस्सर खत पाणी घालत आहेत.

  • या सर्व घटनांना वचक बसविण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल नेहमीच सहकार्य करीत राहणार आहे. अशा समाजघातक इस्लामिक जिहादी घटनांवर वचक बसवावा. तसेच शांतीप्रिय हिंदू समाज व राष्ट्रीय मूल्य यांचे रक्षण करावे, असे आवाहन देखील निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.