Chinchwad : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पती, सासू आणि दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 डिसेंबर 2013 ते 27 जानेवारी 2020 या कालावधीत अंबरनाथ ठाणे येथे घडली.

पती श्याम सखाराम जाधव, सासू सुलोचना सखाराम जाधव, दीर रवींद्र सखाराम जाधव (सर्व रा. अंबरनाथ, ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच आरोपींनी फिर्यादी महिलेला दबावाखाली ठेवून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. फिर्यादी यांची सरासरी नांदण्याची इच्छा असतानाही त्यांना हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.