Delhi : भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशाची माफी मागावी -राहुल गांधी

एमपीसी न्यूज – आज देशाची अर्थव्यवस्था नरेंद्र मोदी यांनी नष्ट केली आहे. त्यामुळे देशाचे आजपर्यंत जे नुकसान झाले आहे ते अद्याप भरून निघाले नाही. त्यांनी नोटबंदी करून देशातील नागरिकांची फसवणूक केली. देशाचा जीडीपी केवळ 9 वरून 4 वर आणून ठेवले आहे. त्यांनी जीडीपी मोजण्याचे प्रमाण देखील बदलून फसवणूक केली आहे. हे सर्व काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशाची माफी मागावी, अशी सडकून टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली.

दिल्ली येथील रामलीला मैदानावर आज काँग्रेसने भारत बचाओ रॅलीचे आयोजन केले. यावेळी त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींसह अमित शहावर जोरदार केली. यावेळी प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिग यांच्यासह बड्या काँग्रेसच्या नेत्यांनी आपले मतं मांडली..

यावेळी राहुल गांधी म्हणाले, हे मोदी सरकार आपापसात फोडण्याचे काम करत आहे. तसेच देशातील सर्व पैसे उद्योजक अंबानी आणि अडानी यांना देऊन त्यांच्यासाठी विविध योजना राबवत आहेत. मोठे उद्योजकांचे कर्ज माफ करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी मोदी सरकार नागरिकांवर कर्जाचा डोंगर उभा करत आहे.

मोदी सरकारने अनेक रोजगार बंद करून बेरोजगारी वाढविली आहे. तसेच देशात हिंसा पसरवली आहे. बरीच प्रसारमाध्यमं देखील तत्वानुसार काम करत नाहीत. त्यामुळे सत्य दाखविले जात नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी आपली जबादारी ओळखून काम केले पाहिजे. कोणत्याही बाबीला न घाबरता काम केले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रातील लोकांनी न घाबरता काम केले पाहिजे. त्यांच्या पाठीशी काँग्रेस राहील, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.