Pimpri : गुंड प्रवृत्तीच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याची मागणी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील खराळवाडी गांधीनगर भागात अज्ञात माफियांची दहशत आहे. या विभागातील सर्वसामान्य नागरिक गुंड प्रवृत्तीच्या विघातक कृत्यांमुळे दहशतीखाली आहेत. या परिसरातील गुंडप्रवृत्ती नामशेष करुन पिंपरी-गांधीनगर खराळवाडीच्या विकासाला चालना द्यावी, अशी मागणी जनजागृती मंचचे अध्यक्ष सुनील पापय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की,  महिला-मुलींची छेडछाड, सर्वसामान्यांना होणारी दमदाटी यामुळे स्थानिक लोक गेल्या काही वर्षांपासून त्रस्त आहेत.  खराळवाडी विभागाचा शहरातील अन्य विभागांच्या तुलनेत विकास झालेला नाही. गांधीनगर खराळवाडीतील वाहतुकीच्या अंतर्गत रस्त्याचे वर्षानुवर्षे रुंदीकरण झालेले नाही. कायदा व सुव्यवस्था राहिली नाही. तरी या भागातील गुंड प्रवृत्तीला आळा घालावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.