Pimpri : यशवंतनगर येथील पिण्याचा दुषित पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा यशवंतनगर येथील पिण्याचा दुषित पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप चव्हाण यांनी क प्रभागाकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, मासुळकर कॉलनी येथील यशवंतनगर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा आहे. ही शाळा महानगरपालिकेची असून गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आजाराना निमंत्रण झाले असून येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा. यावेळी कुणाल जगनाडे, संभाजी मासुळकर, चंद्रशेखर, कणसे, अनिल कोकिरकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.