Dharmendra reacts on closed talkies – ‘जाने कहा गये वो दिन’…
Dharmendra reacts on closed talkies धर्मेंद्र गेल्या काही काळात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. ते समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर प्रतिक्रिया देत आहेत.
एमपीसी न्यूज – तीन महिन्यांपूर्वी ज्याची माहिती देखील नव्हती अशा करोना विषाणूने आता जगाला बंद केले आहे. प्रत्येकजण आपापल्या घरी राहात आहे. ज्यांना अपरिहार्य कारणांसाठी बाहेर पडावे लागत आहे त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे अशी अपेक्षा. मनोरंजन क्षेत्रालाही याची मोठी झळ बसली आहे. तीन महिन्यांपासून सगळी चित्रपटगृहे बंद आहेत. शूटिंग बंद आहे. टीव्ही मालिकांचे जुनेच एपिसोड वारंवार दाखवले जात आहेत.
आता अनलॉक २ सुरु झाले आहे. योग्य ती खबरदारी घेऊन शूटिंगला सुरुवात झाली आहे. पण चित्रपटगृहे मात्र बंदच आहेत. ती लवकर सुरु होण्याची शक्यता धूसर आहे. या परिस्थितीत रिकामी सिनेमागृहे पाहून अभिनेता धर्मेंद्र मात्र दु:खी झाले आहेत. ‘ही शांतता आता सहन होत नाही’, असं म्हणत त्यांनी सिनेमागृहांसाठी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.
धर्मेंद्र यांनी राखी सिनेमागृहाचा फोटो पोस्ट केला आहे. ‘राखी सिनेमागृह, लुधियाना… इथे आम्ही कित्येक चित्रपट पाहिले आहेत. आता ही शांतता सहन होत नाही. उदास व्हायला होतं’. अशा आशयाचे ट्विट करुन धर्मेंद्र यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. धर्मेंद्र गेल्या काही काळात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. ते समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर प्रतिक्रिया देत आहेत. या पार्श्वभूमीवर त्याचे हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
आधी एक पडदा चित्रपटगृहं होती. मग मल्टिप्लेक्स आली. पण सध्या सगळ्यांनाच कुलूप अशी स्थिती आहे. ती चहलपहल, तो माहौल पुन्हा कधी अनुभवायला मिळणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
Rikhy cinema, ludhiyana….. unginnat filmen 🎥 dekhi hain yahaan….ye sannata ……dekh kar ….. dil udaas ho gaya mera ….. pic.twitter.com/MGY5VG3z0S
— Dharmendra Deol (@aapkadharam) July 4, 2020