Dietitian Avinash Sabre : पूर्वी आहार हेच औषध होते, तर सध्या औषधे हाच आहार बनला आहे
एमपीसी न्यूज : पूर्वी आपले पूर्वज निसर्गानुरुप (Dietitian Avinash Sabre) राहून जगत होते. आहार सकस संतुलित घेत असल्याने शारीरिकदृष्ट्या सुदृढ होते. आहार हेच औषधाचे कार्य करत असल्याने कुणीच आजारी पडत नव्हते. आता मात्र प्रत्येक घरात एकतरी आजारी असल्याने जगण्यासाठी गोळ्या औषधांचा आधार घ्यावा लागतो.
पूर्वी आहार हेच औषध होते, तर सध्या औषधे हाच आहार बनला आहे. जुन्या जीवनशैलीकडे वाटचाल करणे गरजेचे आहे. असे न केल्यास मानवजातीचे अध:पतन अटळ आहे. असे मत राहुरी येथील आहारतज्ञ अविनाश साबरे (Dietitian Avinash Sabre) यांनी व्यक्त केले.