Dighi: इन्श्युरन्स पॉलिसाचा परतावा न देता 15 लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – इन्श्युरन्स पॉलिसी काढण्यास भाग पाडून पॉलिसीचा कोणताही परतावा न देता पुन्हा नव्याने पॉलिसी काढण्यास सांगून पाच भामट्यांनी एकाची 15 लाखाची फसवणूक केली. हा प्रकार जून 2015 ते 22 जुलै 2019 दरम्यान घडला. 

याप्रकरणी रितीका खन्ना, अमन कुमार रस्तोगी, निलम गुप्ता, रितम सुरी, सस्क्सेना (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजय नारायण मोरे (वय 44, इंद्रायणीनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपींनी दिल्लीतील एस.बी. इंन्श्युरन्स ब्रोकर कंपनीतून बोलत असल्याचे फिर्यादी मोरे यांना फोनवर सांगितले.  त्यांचा विश्वास संपादन केले.  आरोपींनी फिर्यादी मोरे यांना वेगवेगळ्या कंपन्यांच्या इंन्श्युरन्स पॉलिसी काढून दिल्या. त्या पॉलिसीचा कोणताही परताना दिला नसताना पुन्हा नव्याने पॉलिसी काढण्यास सांगत मोरे यांची 15 लाख 8 हजार 957 रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असे पोलिसांनी सांगितले. दिघी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.