Pimpri : संस्कार प्रतिष्ठानतर्फे 5000 पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
एमपीसी न्यूज – संस्कार प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवडतर्फे 5000 पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
संस्कार प्रतिष्ठान पिंपरी-चिंंचवड शहर महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या महाराष्ट्र राज्यात १९ जिल्ह्यात शाखा आहेत. त्यापैकी कोल्हापूर जिल्हा प्रमुख सचिन जरग यांनी आतापर्यंत ५००० कुटुंबांना प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरग्रस्तांना वह्या पुस्तकांचे तसेच जिवनावश्यक वस्तुंचे वाटप केले गणेशोत्सव संपला की प्रतिष्ठान पुन्हा पुरग्रस्तांच्या मदतीला धाऊन जात आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा कॉलेज महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक पालक सहकार्य करीत आहेत. परिसरातील रिक्षा चालकही मदत करित आहे.