एमपीसी न्यूज – जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी, काळेवाडी आणि सोनोरी गावातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल व इतर उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानभरपाई बाबत तातडीने पंचनामे करण्यात येऊन मदतीबाबत आश्वस्त केले आणि त्याप्रमाणे संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांना आदेश दिले.