Electric Vehicle : अनाधिकृतपणे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करणे धोक्याचे, संबंधितांवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रिक वाहन सोसायटीत, घरी, ऑफीसच्या पार्कीगमध्ये एक्सटेंशन बोर्डद्वारे चार्जिंग करणे (Electric Vehicle) धोक्याचेच आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने बेकायदेशीरपणे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करणार्यांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी डॉ. हाजी जाकिर शेख यांनी केली.
देशासह राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. जे पर्यावरणांसाठी फायदेशीर आहेच, परंतु, निष्काळजीपणामुळे काही दुर्घटनाही होवू शकतात. जसे की अनाधिकृतपणे वायर जोडून इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करण्यास लावले जाते.
यावेळी ओव्हर चार्जिंगमुळे वाहनात आग लागून मोठी दुर्घटना होवू शकते. त्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने महावितरणतर्फे ’ईव्ही’ चार्जिंग सुविधा उपलब्ध (Electric Vehicle) केली आहे. त्याचा वापर केला पाहिजे, असे आवाहन देखील डॉ.शेख यांनी केले आहे.
वाढत्या पेट्रोलच्या किमतींवर पर्यावरणपुरक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहन वापरात वाढ होत आहे. याच पार्श्चभूमीवर इलेक्ट्रिक वाहन वापरकर्ते गाडीमध्ये वाहन चार्जिंगसाठी अनधिकृत एक्सटेंशन बोर्ड बाळगतात.
त्या बोर्डचा वापर करून सोसायटीतील पार्कीगमध्ये, घरासमोर घरगुती मीटरद्वारे वाहन चार्जिंगसाठी लावतात. तर काहीजण ऑफीस पार्कीगमध्ये जिथे कनेक्शन उपलब्ध होईल अशा ठिकाणी वाहन चार्जिंग करीत असतात.
शिवाय, एकदा रात्री चार्जिंगसाठी वाहन लावून सकाळीच बंद करतात तर बऱ्याचदा ऑफीसमध्ये गेल्यावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाहन चार्जिंगला लावतात, जे योग्य नाही. त्यामुळे बॅटरी ओव्हर हिटींग होऊन मोठी दुर्घटना होवू शकते. त्यामुळे अनधिकृतपणे वाहन चार्जिंग करणे टाळावे असे आवाहन त्यांनी केले.
इलेक्ट्रिक वाहन वापरास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात महावितरण’तर्फे चार्जिंग स्टेशन उभारल्यानंतर निकषात बसणार्या अर्जदारांना प्राधान्याने स्वतंत्र ईव्ही चार्जिंग वीजजोडणी देण्यात येत आहे. परंतु, याचा वापर केला जात नाही, यामुळे महावितरण सह राज्य विद्युत विभागाचा महसुल मोठया प्रमाणत बुडत आहे.
म्हणजेच एकीकडे दुर्घटनेचा धोका तर दुसरीकडे महसूल बुडत आहे. त्यामुळे सर्रासपणे विनापरवाना वाहनांकरिता विज वापरणार्या अशा सोसायटीधारकांसह वाहनाकरीता विज वापरणार्या वाहनचालकांची चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
अशी मागणी डॉ.शेख यांनी महावितरण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली आहे. नारिकांना आवाहन करताना डॉ. शेख म्हणाले, तुमचे इलेक्ट्रिक वाहन चार्ज करताना, योग्य चार्जर आणि चार्जिंग स्टेशनची काळजी घ्या. जर तुम्ही घरी फास्ट चार्जर वापरत असाल, तर ही गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही तुमच्या घराच्या इलेक्ट्रिक सिस्टीमवर ओव्हरलोड करत नसाल तर (Electric Vehicle) सामान्य चार्जर वापरणे चांगले होईल.
NCP : …तर गोपीचंद पडळकर यांच्या तोंडाला काळे फासू; नाना काटे यांचा इशारा
चार्जर बसवलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सामान ठेवू नका. कारण आग लागल्यास आग पसरण्यापासून रोखता येईल. यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचे इलेक्ट्रिक वाहन रात्री ऐवजी दिवसा चार्ज करणे. याच्या मदतीने तुम्ही ओव्हर चार्जिंग टाळू शकता, जे आग लागण्याच्या संभाव्य कारणांपैकी एक आहे. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या चार्जरवर चार्ज करण्याची गरज भासली तरी चार्जर ओला होऊ नये हे लक्षात ठेवा.
दरम्यान, याबाबत प्रशासना तर्फे योग्य कारवाई करण्यात आली नाही तर, पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक महावितरण कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही डॉ. हाजी जाकिर शेख यांनी दिला आहे. सामन्य नागरिकांच्या जीवाशी खेळणार्या प्रत्येक दुर्घटनेस प्रशासन जबाबदार राहील, असाही उल्लेख त्यांनी निवेदनात केला आहे.