Mango Export : भारतात आंब्याची निर्यात यावेळी होणार परदेशातून

एमपीसी न्यूज –  सततच्या वातावरणातील बदलामुळे देशात आंब्याच्या उपलब्धतेबाबत काही शंका निर्माण झाल्या आहेत. मार्चमध्ये पाऊस आणि गारपिटीनंतर फेब्रुवारीतील तापमानात कमालीची वाढ झाल्याने शेतकरी दर्जेदार फळांच्या उपलब्धतेबाबत तक्रार करत आहेत.(Mango Export) त्यामुळे यावेळी महाराष्ट्र स्टेट एग्रीकल्चर बोर्डने (एमएसएएमबी)  मध्य आशियाई देशांमधून भारतात आंब्याची निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

एमएसएएमबी सरव्यवस्थापक डीडी शिंदे यांनी सांगितले आहे कि, त्यांनी  मध्य आशिया आणि युएस या देशांतील भारतीय दूतावासांसोबत भारतात आंब्याची निर्यात करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.

 

 

Chikhali News : अन्यथा चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करणार – अजित गव्हाणे

 

या वेळेस मराठवाड्यातील केसर आंब्याचे उत्पादन नेहमीपेक्षा लवकर येणे अपेक्षित आहे. कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याचे यावेळेस कमी उत्पादन येण्याची दाट शक्यता आहे.(Mango Export) एमएसएएमबी वाशी, नवी मुंबई येथे एक मोठे निर्यात सुविधा केंद्र चालवते, ज्याचा वापर निर्यातदार त्यांच्या माल पाठवण्याआधी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी करतात. वाष्प उष्मा उपचार, विकिरण (कमकुवत किरणोत्सर्गी किरणांच्या खेपेस उघड करणे) यासाठी वापरतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.