Crime news : पिकांची नासधुसकरत शेतकरी महिलेला जागा सोडून जाण्याची धमकी
एमपीसी न्यूज : पिकांची नासधुस करत शेतकरी महिलेला ही आमची जागा आहे इथून निघून जा नाही तर तुरुंगात टाकेन अशी धमकी देण्यात आली आहे. (Crime news) हा प्रकार कासारसाई येथे रविवारी (दि.2) सकाळी दहाच्या सुमारास घडला.
याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रामचंद्र साधू गायकवाड,अजित रामचंद्र गायकवाड, शाम अंकुश शितोळे व इतर 10 ते 12 जण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या शेतात गेल्या असता आरोपी तेथे आले व त्यांनी फिर्यादीच्या शेतातील पत्र्याची खोली व त्यातील साहित्य जाळून टाकले.(Crime news) तसेच शेतातील स10 ते 12 गुंठ्यातील सोयाबीनचे पीक नासधूस केले.तसेच यावेळी ही जमीन आमची असून तू ईथून निघून जा नाही तर तुला जिवंत सोडणार नाही. तकुला सहा महिने तुरुंगात टाकेन व तुझ्या कुटुंबाला पॅरेलेस करेन अशी धमकी दिली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.