Mumbai : राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेट घेण्यासाठी बोलावले – अजित पवार
एमपीसी न्यूज – राज्यपालांनी राष्ट्रवादीला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले नसून राष्ट्रवादीच्या नेत्यांना फक्त भेट घेण्यासाठी बोलावले आहे, असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात क्षणाक्षणात बदल होत आहे. शिवसेना व महाआघाडीचे सरकार बनणार असे चित्र निर्माण झाले असतानाच शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने संपूर्ण चित्र पालटले आहे. शिवसेनेने पुरेशा पाठिंब्याचे पत्र सादर न केल्याने त्यांना मुदतवाढ देण्यास राज्यपालांनी नकार दिला. त्यासंदर्भाचे प्रसिद्धीपत्रक राज्यपलांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जारी करण्यात आले आहे.