Hinjawadi Crime : मुलीचा विवाह करून न दिल्याने मुलीच्या वडिलांचे अपहरण

एमपीसी न्यूज – मुलीचा विवाह आपल्यासोबत करून न दिल्याने एकाने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून मुलीच्या वडिलांचे अपहरण केले. हा प्रकार सोमवारी (दि. 9) रात्री साडेनऊ वाजता साखरे वस्ती, हिंजवडी येथे घडला.

काळूराम मारुती हुलावळे (वय 55, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विलास वाघमारे आणि त्याच्या दोन मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम मोरेकर (वय 30) हे फिर्यादी हुलावळे यांच्या खोलीत भाड्याने राहतात. मोरेकर यांनी त्यांच्या मुलीचे लग्न आरोपी विलास याच्यासोबत लाऊन दिले नव्हते. त्याचा राग विलासच्या मनात होता. त्यावरून सोमवारी रात्री विलास आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून मोरेकर यांना दुचाकीवर जबरदस्तीने बसवून पळवून नेले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.