Pune : शेतकरी केंद्रबिंदू असेल तर महाशिव आघाडीला पाठिंबा – राजू शेट्टी

एमपीसी न्यूज – शेतकरी केंद्रबिंदू असेल तर काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना या महाशिव आघाडीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असेल, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज राजू शेट्टी यांनी भेट घेतली. राजू शेट्टी यांनी नुकतेच 3 दिवस जम्मू – काश्मीरमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या त्यांनी समस्या जाणून घेतल्या. ते महाशिव आघाडीत सहभागी झाले तर शेतकऱ्यांना आणखी मदत मिळण्याची आशा आहे.

यापूर्वी त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांना भाजपने फोडून मंत्रिपद दिले, एकप्रकारे शेट्टी यांचे पंख कापण्याचा प्रयत्न करण्यात आला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आगामी काळात ते राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याची कुजबुज आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेट्टी यांनी अनेक आंदोलने केली आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा महाशिव आघाडीला होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.