Ind Vs Aus Test Series : तिसऱ्या कसोटीच्या आधी पाच भारतीय खेळाडू आयसोलेशनमध्ये

एमपीसी न्यूज – ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा तिसरा कसोटी सामना सात जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय संघाच्या रोहित शर्मा, ऋषभ पंत सहीत पाच खेळाडूंना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने याबाबत माहिती दिली आहे.

बायो-बबलचे उल्लंघन केल्याचा संशय असल्याने रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुबमन गिल या पाच खेळाडूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ जिथे वास्तव्यास आहे, तेथून या पाच जणांना वेगळ्या ठिकाणी आयसोलेट करण्यात आले आहे. कोरोना संदर्भातील नियमावली लक्षात घेता इतर भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने या खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून या पाच खेळाडूंना सामन्यासाठी सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान, तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या रोहित शर्माने 30 डिसेंबरला आपला क्वारंटाइन कालावधी संपवत संघात दाखल झाला. उर्वरित दोन सामन्यांसाठी त्याला संघाचा उपकर्णधार करण्यात आलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.