IPL 2020 : असं झालं तरच कोलकाताला मिळेल प्ले-ऑफमध्ये जागा

एमपीसी न्यूज – कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थानवर 60 धावांनी विजय मिळवला. या पराभवासोबत राजस्थानचं आयपीएलच्या तेराव्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. राजस्थान रॉयल्सवर मिळवलेल्या विजयासह कोलकाताने 14 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. असं असलं तरीही त्यांचं प्ले-ऑफमधलं स्थान अद्याप निश्चीत झालेलं नाही. 
सोमवारी (दि.2) दिल्ली विरुद्ध बंगळुरु या सामन्यात बंगळुरुचा संघ 22 किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी हरला, किंवा दिल्लीचा संघ 18 किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी हरला तरच कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होऊ शकतो. या दोन्ही शक्यतांव्यतिरीक्त सामन्याचा निकाल अखेरच्या षटकांत लागला तर दिल्ली आणि बंगळुरु हे दोन्ही संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होतील. असं झाल्यास यानंतर कोलकाताला 3 तारखेच्या सामन्यात मुंबईने हैदराबादवर मात करण गरजेचं ठरणार आहे.
दरम्यान, आज दिल्ली विरुद्ध बंगळुरु यांच्यात सामना रंगणार असून दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे. तसेच या सामान्यावर कोलकाताचं देखील भवितव्य अवलंबून आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.