Alandi : स्वच्छतेची जबाबदारी ओळखून त्या पद्धतीने प्रत्येक नागरिकाने वागणे गरजेचे – कैलास केंद्रे

ओला सुखा कचरा वर्गीकरण करून तो कचरा घंटागाडी मध्येच टाकावा

एमपीसी न्यूज : नागरिकांनी स्वच्छते बद्दलची आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. स्वच्छ भारत किंवा स्वच्छतेची कल्पना,कार्य हे प्रत्येकाने स्वतः च्या घरापासून केल्यावर आपले घर व त्या जवळील परिसर , शहर सुंदर राहणार आहे. त्या अनुषंगाने आपली जबाबदारी ओळखून त्या पद्धतीने प्रत्येक नागरिकाने वागणे गरजेचे आहे. आपले घर, त्या जवळील परिसर व आपले शहर स्वच्छ राखावे असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.

Pimpri : शहरातील या भागाचा पाणीपुरवठा बंद

आळंदी (Alandi) येथील देहूफाटा जवळील श्री गजानन महाराज संस्थान समोर व त्या बाजूकडील इतर एक दोन ठिकाणी चेंबर लाईन तुंबुन तेथून पाणी देहूफाटा पर्यँत रस्त्यावर येत होते. याची दखल तत्काळ पालिकेने घेत कर्मचाऱ्यां मार्फत तेथील काम सुरू केले होते.

चेंबर लाईन मध्ये वाया गेलेले मोठ्या प्रमाणात अन्न पदार्थ व इ .पदार्थ वस्तू मुळे येथील चेंबर लाइन तुंबलेली होती. येथील भागातील काही नागरिक शिळे , वाया  गेलेले अन्न  पदार्थ इ. कचरा घंटागाडी मध्ये न टाकता चेंबर लाईन मध्ये टाकतात. त्यामुळे येथील चेंबर वारंवार तुंबत असल्याची माहिती एका स्थानिक नागरिकानी दिली.

तसेच शहरातील काही चेंबर्स सुध्दा प्लास्टिक पिशव्या वस्तूं मुळे तुंबलेले होते. तेथील ब्लॉकेजेस ही काढलेले आहेत. घंटागाडी मध्ये कचरा टाकण्यात यावा. काही लोक घंटागाडीची वाट न पाहाता इतरत्र कचरा टाकतात. तो टाकू नये. तसेच वाया गेलेले अन्न व इतर वस्तू पदार्थ ही चेंबर्स लाईन मध्ये टाकू नये.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.