Jansanvad Sabha : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

एमपीसी न्यूज – मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात यावी, अशी मागणी आज (सोमवारी) झालेल्या जनसंवाद सभेत (Jansanvad Sabha) नारिकांनी मागणी केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत 83 नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या.

अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 20, 11, 7, 10, 10, 2, 12 आणि 11 नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले. अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या  क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता सतीश इंगळे, समाज विकास विभागाचे उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी भूषवले. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन या विभागांचे (Jansanvad Sabha) अधिकारी उपस्थित होते.

Lampy Virus : शेतकऱ्यांनो लम्पीच्या पार्श्वभूमीवर बैलपोळा काळजीपूर्वक साजरा करा; आमदार सुनिल शेळके यांचे आवाहन

आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या, पदपथ आणि रस्त्यावरील अतिक्रमणामुळे पदपथ दिसत नाहीत त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, असे अतिक्रमण काढण्यात यावे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात यावी, अनेक ठिकाणी ड्रेनेज वाहिन्या तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे दुर्गंध पसरून आरोग्यास धोका निर्माण होत आहे, वेळोवेळी ड्रेनेज वाहिन्या दुरुस्त करण्यात याव्यात, विद्युत पुरवठा सतत खंडित होत आहे, त्यासाठी विद्युत यंत्रणा अधिक सक्षम करावी, शहरात ठिकठिकाणी स्थळ दर्शक, दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, असे फलक झाडांच्या फांद्यांमुळे झाकले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात यावी, रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, रस्त्यावर असलेले खड्डे बुजविण्याचे काम जलद गतीने पूर्ण करावे, पाणी पुरवठा पुरेशा दाबाने करण्यात यावा, अवैध नळ जोडणी घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, नव्याने पदपथ तयार करण्यात यावे, अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात यावी, रस्त्यांच्या बाजूने पथदिवे लावावेत, अशा सूचनावजा तक्रारी आज झालेल्या जनसंवाद सभेमध्ये (Jansanvad Sabha) नागरिकांनी मांडल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.